Ads
Ads

ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे! माझी निवडणूक मायबाप जनतेनेच हाती घेतली आहे - ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके

ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे!
माझी निवडणूक मायबाप जनतेनेच हाती घेतली आहे - ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके 
शिरूर (प्रतिनिधी ) - सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढे प्रेम जनतेने दिले. जनतेचा उत्साह प्रेम पाहूनच समोर दिसत आहे की ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे माझा विजय निश्चित असल्याचे महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी प्रचारार्थ विजय  संकल्प सभेत व्यक्त केला.
           माऊली कटके पुढे म्हणाले की मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील आहे. एवढा स्नेह व एवढं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. समोरचा उमेदवार हा पैसेवाला असून त्याच्याकडे हजारो कोटी रुपये आल्याचे समजते  आहे. तो पैसा कुठून आला कसा आला हे सगळ्यांनाच माहिती आहे. सर्वसामान्य जनतेचा पैसा Image निवडणूक  आल्यावर बाहेर काढायचा तो पैसा वापरून निवडणूक जिंकायची हा त्यांचा उद्योग चालू आहे. सर्वसामान्य जनतेचा पैसा आपलाच पैसा आपल्याच संस्था आपल्यावरच तोच पैसा वापरायचा दडपशाही करायची हे सध्या चालू आहे.
             आत्ताच्या विद्यमान आमदाराने फक्त ठेकेदारांनाच सांभाळण्याचे काम केले विकास कामे फक्त जनतेची दिशाभूल करण्याचे काम सध्या सुरू आहे. मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सहकारी साखर कारखाना बंद पाडून सर्वसामान्य शेतकरी कामगार वर्गांना देशोधडीला लावण्याचे काम आमदाराने केले.
                शिरूर हवेली मतदारसंघातील जनतेने तो मला डोक्यावर घेतले. आता तीच जनता तुम्हाला 20 नोव्हेंबरला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. मला जनताच घरी Image बसवेल. खोटे नाटे बोलून पैशाच्या ताकदीवर दबाव तंत्राचा वापर करून खोट्या केसेस दाखल करून त्रास देण्याचे काम  या आमदाराने केले. ही दादागिरी व मुजोरी इथून पुढे चालणार नाही. जनताच ही दादागिरी व मुजोरी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही.
                 आता महायुतीचे सरकार येणार आहे. माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सहकारी साखर कारखाना पुन्हा जोमाने उभा करण्याचे काम आपण इथून पुढे करणार आहोत.शेतकरी व कामगारांना न्याय देण्याचे काम आपण सरकारच्या माध्यमातून  करणार आहोत.
                  माऊली कटके पुढे म्हणाले की इथून पुढे शेतकरी सर्वसामान्य जनतेला कोणी मुजोरी व दडपशाही करून  त्रास देण्याचे काम केले तर जशास तसे उत्तर दिले जाईल हा पण एक पैलवान माणूस आहे  हे लक्षात ठेवा  असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
                  अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपण या शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठवावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली आपण हे दिलेले प्रेम आणि स्नेह याची उत्तरे मी चांगल्या कामाच्या माध्यमातून करेल तुमच्या विश्वासास कुठे तडा जाणार नाही ही खात्री देतो.